Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » मोठ्या वयाच्या अविवाहित मुलींचा एकांत परिस्थिती चिंताजनक -समाजातील एक गंभीर समस्या:

मोठ्या वयाच्या अविवाहित मुलींचा एकांत परिस्थिती चिंताजनक -समाजातील एक गंभीर समस्या:

Trending Photos

Ankush tv18 news network-

आज समाजात मोठ्या वयाच्या अविवाहित मुली घरी बसून आहेत. आता देखील जर आई-वडील जागे झाले नाहीत, तर परिस्थिती अधिकच स्फोटक होऊ शकते…

आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके “जागृत” झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत…
समाजात आज 27-28-32 वयापर्यंत अनेक मुली अविवाहित आहेत, कारण त्यांच्या अपेक्षा कधी-कधी त्यांच्या परिस्थितीपेक्षाही जास्त असतात. अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात.
यामुळे समाजाची प्रतिमा देखील खराब होत चालली आहे.
सर्वात मोठा मानवी आनंद म्हणजे सुखी वैवाहिक जीवन.
पैसा आवश्यक आहेच , पण तो मर्यादेपर्यंतच.
फक्त पैशासाठी चांगली नाती नाकारणे चुकीचे आहे.
पहिली प्राथमिकता सुखी संसार आणि चांगले कुटुंब हीच असावी.
अधिक पैशाच्या मोहात चांगली नाती गमावणे योग्य नाही.
“संपत्ती विकत घेता येते, पण गुण नाही.”
माझ्या मते घर-परिवार आणि मुलाचा स्वभाव चांगला आहे का हे पहावे;
“जास्त” या अपेक्षेत चांगले नाते हातातून जाऊ देऊ नये.
सुखी वैवाहिक जीवन जगा.
30 नंतर झालेले लग्न अनेकदा तडजोड ठरते आणि वैद्यकीय दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होतात.
आज याहूनही वाईट परिस्थिती कुंडली जुळवणीमुळे निर्माण झाली आहे.
ज्यांच्याशी कुंडली जुळते पण घर-परिवार किंवा मुलगा चांगला नाही,
आणि जिथे मुलामध्ये सर्व गुण आहेत तिथे कुंडली जुळत नाही—
अशा वेळी आपण सर्व काही चांगले असूनही फक्त कुंडलीमुळे नातं तोडतो.
36 पैकी 20 गुण किंवा 36/36 गुण जुळूनही अनेकांचे संसार दुःखी आहेत,
कारण आपण मुलाचे खरे गुण पाहिलेच नाहीत.

कुंडलीच्या नावाखाली आधुनिक, सुशिक्षित समाजाला एक शतक मागे नेले आहे.
या चक्रात कित्येक चांगली नाती जुळतच नाहीत.
आज मुलींसाठी नातं शोधताना
मुलामध्ये जणू २४ कॅरेट सोनं शोधल्यासारखं पाहिलं जातं,
आणि बघता-बघता चार-पाच वर्षे निघून जातात.
उच्च “शिक्षण” किंवा “जॉब” या नावाखालीही वेळ घालवला जातो.

मुलगा पाहण्याची पद्धतच वेळ वाया घालवण्याचं उदाहरण बनली आहे…
स्वतःचं घर आहे का
असल्यास फर्निचर कसं आहे
घरात खोल्या किती
गाडी आहे का कोणती
राहणीमान, खाणंपिणं कसं
भाऊ-बहिणी किती
आई-वडील कुणाकडे आहेत
बहिणींची लग्नं झाली आहेत का
आई-वडिलांचा स्वभाव कसा आहे
नातेवाईक आधुनिक विचारांचे आहेत का
मुलाची उंची किती
रंगरूप कसं
शिक्षण, उत्पन्न, बँक बॅलन्स किती
सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे का
मित्र किती आहे
घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नव्हता.
दांपत्य जीवन गोड-तिखट अनुभवांतून सरत जायचं.
दोघं एकमेकांच्या म्हातारपणाची काठी बनायचे,
आणि नातवंडांमध्ये संस्कार रुजवायचे.
आज ते संस्कार कुठे आहेत
लाज-शरम इतिहासजमा झाली आहे.
नात्यांमध्ये तडजोडीची वेळ येते.
आज मुलं-मुली समाजाबाहेरही लग्न करायला तयार आहेत,
आणि म्हणतात— “आमच्या समाजात आमच्यासारखा कोणीच नाही.”
मुलं-मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करताना
तेव्हा कुणाला कुंडली आठवत नाही.
आई-वडीलही तेव्हा सगळं मान्य करतात.
तेव्हा पैसा, स्टेटस, इनकम काहीच अडथळा ठरत नाही.

आता देखील आई-वडील जागे झाले नाहीत
तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल.
मुलींची लग्नं 22-23-24 वयात
आणि मुलांची 25-26 वयात झाली पाहिजेत.
सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात.
घर, गाडी, बंगला याआधी
वर्तन आणि स्वभाव तोलून पाहा.
आई-वडीलही आर्थिक झगमगाटात वाहून गेले आहेत.
पैशांच्या शर्यतीत नाती-गोती फार मागे पडली आहेत.
घरं तुटत आहेत,
प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे.
या पिढीने कुटुंबसंस्थेचं असं तमाशा केलं आहे
की येणाऱ्या पिढ्या “संस्कार”
फक्त पुस्तकांत वाचतील.
समाजाने आता जागं होणं अत्यंत गरजेचं आहे,
नाहीतर नाती शोधतच राहू…

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा