Home » Uncategorized # e paper » वरणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

वरणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush Tv18 News Network

जळगाव

वरणगाव परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे, या भागातील भोगवतीला नदीला मोठा पूर आल्यामुळे या परिसरातील शेतक-यांची सर्व पीके पाण्याखाली गेल्याने येथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना   शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल, असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर व परिसरातील नुकसानग्रस्त भागांची मंत्री श्री  सावकारे यांनी आज पाहणी केली, त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मीनल  करनवाल, दिलीउपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, वरणगावनगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम आदि विभागांचे
अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री सावकारे म्हणाले की, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन आपल्या सोबत असून लवकरात लवकर आपणास नुकसान भरपाई दिली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी  शेतकऱ्यांना दिला. नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक  महसूल प्रशासनास दिले.
मंत्री, संजय सावकारे, यांच्या हस्ते, मौजे साकेगाव ता.भुसावळ येथील लक्ष्मण वसंत ठाकरे हा  इसम वाघूर नदीपुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याने या इसमाचे वारस अक्काबाई सुधाकर भिलयांना रु.4,00,000/- यांच्या खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.
भोगवती नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे गावातील घरे, दुकाने व सार्वजनिकठिकाणी पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरामुळे आचेगाव, पिंपळगाव, तळवेल,  ओझरखेडा, काहूरखेडा, बोहर्डी व कठोरा या भागांतील संपर्क तुटला असून अनेक घरांची भिंती व  अंगणाचे कुंपण पडले आहेत. एका महिलेच्या घरावर भिंत कोसळल्याने ती जखमी झालेबाबत प्राथमिक माहिती मिळाली असता, तहसिलदार भुसावळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता, पुराच्या पाण्यामुळे गावातील घरे, दुकाने व सार्वजनिक ठिकाणीपाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेचे दिसून आलेने स्थानिक प्रशासन यांना तातडीने उपाययोजना   करणेबाबत सूचना दिल्या तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरीकांना धीर दिला. आपत्ती व्यवस्थापन   यंत्रणा, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. तसेच या  ठिकाणी झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करणेकामी संबंधित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   प्रत्येक सजेवरील ग्राम महसूल अधिकारी, कृषि सहायक व ग्रामसेवक यांनी आज   युध्दपातळीवर संयुक्तीक पंचनाम्याचे कामे सुरु केले आहे. अशी माहिती यावेळी तहसीलदार श्रीमती
लबडे यांनी दिली. तसेच नगरपालिकेकडून पंपिंग मशिनद्वारे पाणी उपसा, रस्ते मोकळे करण्याचे ववीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, नदी व नाल्याच्या
काठावर जाणे टाळावे, प्रभावित कुटुंबांना तातडीने मदत पुरविली जात आहे, कोणत्याही प्रकारचीअडचण असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगाव किंवा तहसील कार्यालय भुसावळ येथीलआपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा